Sunday, March 17, 2013

Offbeat भटकंती..२

कोकणदिवा झाल्यावर समोर रायगड दिसला, तोरणा ते रायगड जाण्याची अतिव इच्छा होत होती, पण बरोबर कोणी नव्हते आणि फेब्रुवारी म्हंटल्यावर उन्हाने तस सगळच अवघड होणार होते, पण बरेच ठिकाणी वाचण्यात आले होते, रायलिंग पठार तिथुन दिसणारा लिंगाणा, आणि तिथुनच असणारी बोराट्याची नाळ, तर ठरले तर या शनिवारी रायलिंग पठार गाठायचेच. अनेक ठिकाणी वाचण्यात आले होते, की हारपुड गावापर्यंत रस्ता आहे, तिथुन मोहरी गावात पायी जावे लागते, मग म्हंटले की बघु गुगल मॅपवर काय दिसते आहे ते. गुगल मॅपवर तर थेट मोहरी गावापर्यंत रस्ता आहे असे दिसत होते infact मोहरी गावात तर बस स्टॉप आहे असे दिसत होते, म्हंटले च्याआयला काही ब्लॉगवाले बरेच पुर्वी जाऊन आलेले दिसता आहेत, आता तर बस जाते, म्ह्णजे कार तर जाईलच जाईल.

आम्ही निघालो around 7, तोरण्याच्या पायथ्यापाशी ९ च्या आसपास पोहोचलो, तिथे पोहोचुन नाश्तावगैरे घेतला आणि मढेघाटाकडे जाणारा रस्ता घेतला, तो रस्ता तसा सापडणे एकदम सोपे आहे, वेल्हे गावात कोणालाही विचारले, तर मढेघाटाचा रस्ता सहज सापडु शकतो. आम्ही नाश्ता करणार्‍या ठिकाणी विचारले की मोहरी गावाकडे जायचा रस्ता कसा आहे, तर तो सुद्धा तेच म्हणाला, तिकडे रस्ता नाहीये, हारपुड गावातुन पायी जावे लागते, आणि तुम्ही चांगले ट्रेकर असाल तरच जा नाही तर कठिण आहे. आम्ही म्हंटले की च्याआयला बस जाते आणि या लोकांना पत्ताच नाही!

आम्ही मढेघाटच्या रस्त्याला लागलो, मढेघाटात दरवर्षी आल्याने तो रस्ता परिचयाचा होता. मढेघाट म्हणजे ती जागा जिथुन तानाजी मालुसरे यांचे मृतशरीर (मढ) सिंहगडावरच्या लढ्यानंतर या घाटातुन कोकणातल्या त्यांच्या गावात नेले होते, म्हणुन मढेघाट. जर तुम्ही पावसाळ्यात मढेघाटात गेले नसाल, तर तुम्ही एका फार भारी गोष्टीस मिस केले आहे. असो, आम्ही निघालो, मढेघाटाच्या अलीकडे आल्यावर आम्ही एके ठिकाणी विचारले, मोहरी गावाचा रस्ता कुठे आहे, तेव्हा लोक म्हणाले, रस्ता आहे, तसा कच्चा आहे, पण गाडी जाईल तिकडे आम्ही विचारले, बस जाते का? तर ते म्हणाले, नाही अजुन रस्ता एवढा चांगला नाहीये की बस जाईल. Shit! गुगलने solid गंडवले.. जिथे बस जातच नाही तिथे बस स्टॉप दाखवला!

एवढ्या दुर येऊन ते ठिकाण न बघणे काही रुचले नसते, म्हणुन हिंमत करुन गाडी टाकली समोरुन एक सुमो येताना दिसली, म्हंटले, चला काही तरी गाडी तर येते आहे, पण लगेचच एका ठिकाणी रोडरोलर वगैरे आणुन खडी टाकणे वगैरे काम चालु होते, आणि भुसभुशीत मातीचा सगळा रस्ता होता, तरी हिंमत केली आणि गाडी घातली, सुदैवाने गाडीचे (माझ्या लोगानचे) ground clearance चांगले असल्याने गाडी निघुन गेली, मध्ये अजुन एका ठिकाणी रस्त्याचे काम सुरु होते, तेव्हा बाजुने गाडी काढली आणि अशी बरीच धाडसे करत कशी बशी गाडी मोहरी गावात आणली.

मोहरी गावातुन रायलिंग पठाराचा रस्ता तसा सरळ सरळच आहे, तिथे विचारले तर आम्हाला लोक म्हणाले, की जा रस्त्यात खाणाखुणा केल्या आहेत, आम्ही गेलो तसेच पुढे, पण अर्धापाऊण तास फिरफिर केल्यावर सुद्धा रस्ता काही सापडला नाही, आता काही होत नाही असे समजुन आम्ही परत फिरलो, पण आमचे नशीब जोरात होते त्यामुळे परत फिरत असताना एक गावातली धनगर बाई तिच्या मुली बरोबर दिसली, तीने रस्ता दाखवणे कबुल केले थोड्या रुपयात, म्हंटले ठिक आहे, तिथुन सुमारे अर्ध्या पाऊण तासात आम्ही रायलिंग पठारावर पोहोचलो, तिथुन लिंगाण्याचा अशक्य भारी view मिळत होता, आणि हो मागे रायगडसुद्धा, त्या बाईने आम्हाला रायगडकडे जाणारी बोराट्याची नाळसुद्धा दाखवली. तो view बघुन आम्ही पार वेडेच झालो होतो, आणि हो, काही अती धाडसी तरुण तरुणी समोर लिंगाणा सर करताना दिसत होते, जे आम्हाला कधी करणे शक्यच होणार नव्हते (खोटे का बोला).

जवळपास तासभर तिथे थांबुन आम्ही परत फिरलो, त्या बाईने आम्हाला परतीचा रस्तासुद्धा दाखवला, परत जाताना आम्ही ज्या रस्त्याने आलो तो रस्ता खोदुन ठेवला होता त्यामुळे आम्ही एका दुसर्‍या रस्त्याने परत आलो, तो रस्ता खरतर रस्ताच नव्हता, एक गाडी जाईल एवढी जागा होती आणि डाव्या बाजुस दरी आणि उजव्या बाजुस पहाड, समोरुन कोणती गाडी आली असती तर काही खर नव्हते सुदैवाने तस काहीही न होता आम्ही सुरळीत मेन रोडला लागलो husshhh..

रायलिंग पठारावर जायला मजा तर आलीच पण काही गोष्टीपण समजल्या, पहिली म्हणजे, कुठेही कार घेऊन जायचे नाही, आणि गुगल मॅपसुद्धा गंडवु शकतात. असो, माझ्या मते मोहरी गावाचा रस्ता पुढच्या ४-५ महिन्यात बर्‍यापैकी तयार झाला असेल so जाऊन बघायला काही हरकत नसावी...

Search on google map with this parameter, but beware the road is under construction, confirm with locals..


Look out for this sign on your left while on way to Madhe Ghat!


Boratyachi Naal route.. going from near Rayling pathar..




Left Torna to right Rajgad..

Tuesday, March 5, 2013

Offbeat भटकंती..१


लडाख ट्रिप नंतर हा पहिलाच लेख, मध्ये अनेकवेळा लिहायला घेतले पण काही पुर्ण झाले नाही त्यास आळशीपणा हे एकच कारण. सचिन ची रिटायरमेंट, Indian टीमची टेस्ट मधली दैन्यावस्था (आता बरे चालु आहे म्हणा) आणि अशा अनेक गोष्टी लिहायला घेतल्या आणि ठेऊन दिल्या, तर म्हंटले आता सिजन मधला शेवटचा ट्रेक / भटकंती केली आहे, त्याबद्द्ल तरी लिहु.

तस तर लडाख ट्रिप नंतर फारसे भटकणे झालेच नाही, पण ३-४ महिने झाले डिसेंबर उजाडला मग म्हंटले की बॉस आता तर काही तरी केलेच पाहिजे, आख्खा ट्रेक सिजन डोळ्यासमोरुन फुकट जात होता. ट्रेक न होण्याचे कारण मित्र सुद्धा होते, काही लोकांचा ट्रेक मधला interest च संपला होता आणि काही लोक लग्नाच्या मागे लागले होते आणि अनेकांचे झालेसुद्धा होते, त्यामुळे जे काही उरले सुरले होते त्यांच्या हातापायापडुन आपली ट्रेक करण्याची इच्छा पुर्ण करणे हा एकच मार्ग होता. आमच्या मित्रांना ट्रेकला जायचे म्हणजे एक टुर पॅकेज द्यावे लागते, किती अंतर आहे, जेवणाची सोय कुठे आहे, कार असेल तरी ट्रेकला येऊ, जास्त चढायचे असेल तर नको, काही पोरांना तर मी उन्हात फिरुन काळा होइल याची पण भिती.. (आवरा!), जास्तीत जास्त संध्याकाळी ६ पर्यंत पुण्यात येणार असेल तरच येऊ. एका मित्राने तर माझ्या मोबाइल मधले गाणे कार मध्ये लावणार असशील तरच येईल असे सुद्धा सांगितले. असे सर्वांचे सर्व काही ऎकुन आमचा ट्रेक सुरु होतो. अर्थातच ट्रेकला गेल्यावर जे होणार असते तेच होते, तरी सुद्धा सुरुवातीला सगळी अशी आरडाओरड झालीच पाहिजे. एका अर्थी हे चांगले सुद्धा होते, त्यामुळे बहुतांशवेळी आमचे ट्रेक वेळेत पुर्ण होऊन फार काही त्रास न होता आम्ही निवांत घरी येतो, ट्रेकला जाणे हेच मोठे थ्रिल असते, त्यामुळे ट्रेकला जाऊन इतर काही थ्रिल करण्याची आमची काही तयारी नसते त्यामुळे कोणत्याही ट्रेकची प्लॅनिंग ही सगळ्यात महत्त्वाची. खरा भटक्या म्हणेल तेव्हा बॅग घेऊन तयार असतो असे म्हणणारे अनेक लोक आहेत, पण तसे करणारे फार कमी लोक आहेत आणि आम्ही तर त्यातले नक्कीच नाही. असो, या सिजन मध्ये २ लैच भारी ट्रेक / जागा बघणे झाले. 

१. कोकणदिवा (Kokandiva)

कोकणदिवा नावाचा किल्ला आहे, हे सांगितले तर अनेक लोक विश्वास ठेवणार नाही, माझ्या मित्रांनी पण नाही ठेवला, पण तिथे गेलो आणि किल्ला प्रत्यक्ष पाहिला. अप्रतिम किल्ला आहे, आणि इथुन रायगड इतका भारी दिसतो की विचारता सोय नाही, खर तर हा पुण्यापासुन फार लांब नाहीये, पण फारसा प्रसिद्ध सुद्धा नाहीये, काही ट्रेक ग्रुप नेतात खरे, आणि आम्ही सुद्धा त्याच आशेने गेलो होतो,एका ट्रेक ग्रुपचा ट्रेक होता कोकणदिव्याचा पण ते माणशी १००० रुपये घेणार होते, एवढे महाग! बापरे नको, त्यापेक्षा आपण एक idea करु, आपण या ट्रेक ग्रुपच्या वेळेतच पोहोचु आणि त्यांच्या मागे मागे किल्ल्यावर जाऊ. अर्थातच तो ट्रेक ग्रुप आलाच नाही (१००० कोण देणार हो). पण आम्हाला सापडला व्यवस्थित रस्ता. फार कठिण नव्हता.

रस्ता -> पुण्यातुन जाताना सिंहगड रोड गाठायचा, सिंहगड रोडवरुन सरळ जायचे थेट पानशेत बोटिंग क्लबच्या शेजारुन घोळ गावाचा रस्ता गाठायचा आणि त्या रस्त्याने सरळ सरळ जायचे रस्ता घोळ गावात येऊन संपतो त्यामुळे चुकण्याची शक्यता नाही. हा खालचा मॅप पाहा. 





पानशेत बोट क्लब पासुन ३१ किमी वर घोळ गाव आहे (पुण्यापासुन अंदाजे ६७ किमी). घोळ गावापासुन ४ किमी वर गारजाईवाडी नावाचे गाव आहे तिथुन ट्रेकला सुरुवात होते, घोळ गावापाशी पोहोचण्याच्या थोडे अलीकडे, जवळपास २०० मीटर अंतरावर एक मातीची पायवाट डावीकडे वळते, तशी ती पायवाट ४ चाकी जाइल एवढी मोठी आहे, ती वाट सरळ गारजाईवाडी गावातच जाते. कारण घोळ गावात आम्ही गेलो तेव्हा आमच्याकडे त्यांनी ५०० रुपये मागितले कोकणदिव्याचा रस्ता दाखवण्याचे आणि म्हणाले की जाऊन येऊन ७-८ तास लागतील. पण प्रत्यक्षात आम्हाला ५ तास लागले. गारजाईवाडीची वाट तिथे आलेल्या enduro च्या स्पर्धकांनी दाखवली ज्यांची फारच दैन्यावस्था झाली होती, केवळ adventure sport ची खाज म्हणुन आपल्या शारीरिक क्षमतेला न ओळखणारे लोक पाहुन आश्चर्य वाटले, रस्त्यात बरेच लोक सायकली घेऊन आडवे झाले होते, (हॉर्न दिला तरी बाजुला होत नव्हते!). 

असो तो वेगळा मुद्दा, त्या रस्त्याने गारजाईवाडी ४ किमी आहे, तशी थोडी हिंमत केली असती तर कार गेली असती पण कशाला नसते धंदे, जाऊ चालत म्हणुन आम्ही तिथुन चालत गारजाईवाडीला गेलो. तिकडे गावात जाऊन एक वाटाड्या घेतला, ज्याशिवाय ट्रेक करण शक्यच नव्हते, आणि तस सुद्धा आम्हालापण नसते धाडस करुन दुसर्‍यादिवशीच्या पेपरमध्ये नाव नको होते. वाटाड्याने ३०० रुपये घेतले पण व्यवस्थित वर नेले. किल्ल्यावरुन दिसणारे दृष्य पाहुन डोळ्यांचे पारण फिटले. समोर आपला रायगड... धन्य पावलो. रायगडावर जायची मजा वेगळीच पण तो रायगड इथे कोकणदिव्यावरुन पाहण्याची मजा काही औरच. आणि हो या किल्ल्याला कोकणदिवा अशासाठी म्हणतात कारण इथुन कोकणातल्या गावातले दिवे दिसतात. या किल्ल्यावरुन दुसर्‍याबाजुन खाली उतरले की कावळ्या घाटातुन सरळ कोकणात उतरता येते, सांडोशी नावाच्या गावात.

किल्ल्यावर तस काही बघण्यासारखे नाही, पण पाणी मात्र आहे. इथे वर जायला काही दोर्‍यावगैरेची गरज लागत नाही, हे सर्वात चांगले कोणीपण जाऊ शकते, चढ थोडा जास्त आहे, आणि उतरताना बुड टेकवुनच उतरावे लागते कारण भुसभुशीत माती पण एकंदरीत फार अवघड वगैरे नाहीये ट्रेक. माझ्यामते नोव्हेंबर ते फेब्रुवारीखेरीज हा ट्रेक अन्यवेळेस करणे त्रासदायक ठरु शकेल. पण हा प्रत्येकाने नक्कीच जाऊन यावा असा किल्ला आहे, काही तरी वेगळे केल्याचे समाधान मिळते आणि समोर रायगड दिसतो आणखी काय पाहिजे!

Kokan diva pics

KOKANDIVA FIRST LOOK



SINHAGAD AS SEEN FROM PANSHET



AT KOKANDIVA

RAIGAD AS SEEN FROM KOKANDIVA



Monday, September 3, 2012

Ladakh Trip Planning



ही पोस्ट मुद्दामच English मध्ये आहे सगळ्यांपर्यंत पोहोचावी म्हणुन, मब्लॉवि ला आक्षेप नसावा ही अपेक्षा.


1. Plan your trip - Make sure you have a plan for each day. Doesn't matter if everything doesn't   go as planned, but you must have a plan. It helps.

2. Don't keep any of the trip essential shopping pending, or to be purchased in some other city, as there is a possibility that markets may be closed the day you will be reaching that city.

3. Don’t take too much pressure of the Hotel bookings and all, they are available in plenty.

4. Make use of all the available information on the net. Specially sights like BCM touring are great help.

5. Don't be afraid of AMS. Drink lot of water and in between Manali to Leh if needed have a Dymox before sleep. A lot of water (and I mean it) helps.

6. Rohtang is closed on Tuesday so plan your trip such a way that you don’t get stuck. As every day is important.

7. Its best at least from my point of view to do this trip on a bullet, it’s all together different experience. 

8. Delhi has a lot of places to offer bullet on rent, we did it from Tony bullet and it was a very good experience. We never felt cheated.
(Deposit 20k - refundable after deducting few 100s for maintainance + 700/ day bike rent)

9. Plan travel only during the day, not only it is safe, but you certainly don’t want to miss on any of the nature's beauty.

10. Do Manali to Leh in  3 days, to enjoy the ride, as it is the best part of the trip.

11. If you are experiancing any body pain - Pls don’t go, the trip requires you to be very fit physically as well as mentally.

12. Don’t drive too fast. Be a safe highway driver 55-60km/h is an ideal speed.

13. Use Bungee cods instead of Nylon ropes to tie the luggage to the bike, Bungee cods are very effective, though they have a short life, they will save you a lot of effort and they are not that costly too. We got a bundle of Bungee cods at 120 bucks from Karol bag. 1 Bundle suffice to 3 people. You can purchase couple of them for the whole trip.  I think 3 bundles are sufficient for 3 people for a trip.

14. Leh DC office is open only till 4 o clock in the afternoon. You need to have permits to go for  Pangong and Nubra. No permits for Khardung la.

15.Summer Harvest is the best hotel in Leh please visit it.

Below was our Schedule for the trip and approximate costing for the trip.



And below is our trip route



I hope this information helps you, happy riding..

Get to see all the pics of the trip on the link below

https://plus.google.com/photos/112518365147848107896/albums/5778642091354521953?authkey=CIy5n5mbm_mJkQE


Read all the parts of the Ladakh Trip (Part 1 to 7 in Marathi) by clicking on the link below.

लडाख.. बुलेट आणि मी.. भाग ७

दिवस १२- २ जुलै २०१२, (आषाढ शु. १३ शके १९३४) - (Distance covered - ३९९ km) 
आम्हाला वाटले की आता सगळा रस्ता चांगला असेल सरळसोट त्यामुळॆ किमान ४०० किमी तर आज आरामात होऊन जातील, सकाळी ७ च्यासुमारास श्रीनगर सोडले, तसा रस्ता चांगला होता पण त्या रस्त्यावर अचानकच मध्ये ५० एक आर्मी ट्रक्स शिरले त्यांना overtake करणे खरोखरच दिव्य होते कारण ते साइडच देत नव्हते कस बस त्यांना ओव्हरटेक केला पण पुढे गेलो तर अजुन ५० ट्रक होते बेकार कटकट होती, आणि त्यात सगळा रस्ता घाटाचाच होता, त्यात अमरनाथ यात्रेकरुंची जाण्याची आणि येण्याची गर्दी होती आणि वरुन उन्हाचा तडाखा तो वेगळाच, खरतर या रस्त्यावर गाडीचालवणे खरोखरच कठिण त्यापेक्षाही जास्त कंटाळवाणे होते, आम्ही दुपारी २ च्या सुमारास उधमपुरला पोहोचलो आणि तिथे घाटाचा रस्ता संपला. उधमपुरहुन पठाणकोटला जायला एक मधला रस्ता होता ज्यात जम्मुला जावे लागत नाही. आम्ही संध्याकाळी ७ च्या सुमारास पठाणकोटला पोहोचलो, आधी ठरवले होते की पठाणकोटला मुक्काम करायचा पण नंतर ठरवले की जाऊ अजुन थोडे पुढे, त्यामुळे अजुन थोडे पुढे जाऊन मुकेरिया नावाच्या एका गावात मुक्काम केला. मुकेरिया मध्ये घालवलेली रात्र आयुष्यातली सगळ्यात खराब रात्र होती, तिथे किमान तापमान ४०-४५ डिग्री होते, रात्री सुद्धा! आणि त्यात आम्ही ज्या हॉटेलमध्ये थांबलो होतो तिकडे रात्रभर लाईटची जा ये चालली होती त्यामुळॆ अजुनच त्रास, रात्री २ वाजता आम्ही अक्षरश: घामाने निथळत होतो,

दिवस १३- ३ जुलै २०१२, (आषाढ शु. १४ शके १९३४) - (Distance covered - ४४१ km) 
पहाटे ५ वाजता आम्ही सगळे आटोपुन तयार होतो पण स्वप्निलची गाडी पंक्चर झाली होती, त्यामुळे तासभर त्यात मोडला, पावणेसातच्या सुमारास आम्ही मुकेरिया सोडले ते तिथे कधीच न परत जाण्याची वेळ येऊ नये ही प्रार्थना करुनच! मुकेरिया नंतरचा रस्ता अतिशय चांगला होता आत्तापर्यंतच्या रस्त्यांमधला सर्वोत्तम. ऊन प्रचंड होते पण रस्ता चांगला असल्याने ठिक होते. मुकेरिया नंतर लुधियाना, जालंधर अशी शहरे पार करत आम्ही हरियाणामध्ये अंबालाला पोहोचलो, दुपारचे ३ वाजले होते आणि दिल्ली अजुन जवळपास २०० किमी दुर होते. अंबालाच्या पुढे जेवण घेऊन आम्ही संध्याकाळी ७ च्यासुमारास दिल्लीला पोहोचलो, आणि करोल बागमधल्या हॉटेलमध्ये सामान टाकले.

दिल्लीला पोहोचल्यावर रात्री झोपताना लक्षात आले, की बॉस आज ट्रिप संपली... Finally १३ दिवस आणि जवळपास २५०० किमी नंतर आमची ट्रिप संपली होती. दुसर्‍या दिवशी पासुन नो बाइकिंग, सामानाची बांधाबांध नाही, सकाळी लवकर उठणे नाही, उन्हात फिरणे नाही आणि Bike trip ची excitement सुद्धा नाही :(.
दिवस १४- ४ जुलै २०१२, (आषाढ शु. १५ शके १९३४) - (Distance covered - ० km)
आजचा दिल्लीचा शेवटचा दिवस होता, संध्याकाळी पुण्याला परत जायची फ्लाइट होती. आम्ही बाइक परत केल्या बाकी फॉर्मॅलिटिज पुर्णकेल्या थोडे इकडे तिकडे गेलो आणि संध्याकाळची पुण्याला परतीची फ्लाईट पकडली आणि रात्री १० च्या आसपास पुण्याला पोहोचलो.
Click here for part 4
Click here for part 5

Click here for part 6
Click here to view our planning for the trip

Friday, August 24, 2012

लडाख.. बुलेट आणि मी.. भाग ६

दिवस ११- १ जुलै २०१२, (आषाढ शु. १२ शके १९३४) - (Distance covered - 147 km)
द्रासला कारगीलचे वॉर मेमोरिअल आहे, तिथे काय आहे ते लिहुन सांगण्यापेक्षा हा व्हिडिओ बघणे जास्त रास्त होईल.



प्रत्यक्ष ते मेमोरिअल बघणे हा अंगावर शहारा आणणारा अनुभव होता, एवढ्या दुर्गम ठिकाणी जिथे राहणेच एवढे कठिण होते, तिथे १५-१६००० फुटावर जाऊन युद्ध करणे अशक्यकोटीचे काम होते, आणि ते आपल्या जवानांनी साध्य केले होते, त्यामुळॆ Indian Army बद्दलचा आदर अधिकच वाढला.

द्रास नंतर आम्ही श्रीनगरकडे जाऊ लागलो, द्रास आणि श्रीनगरच्या मध्ये आहे झोझिला पास, जो आत्तापर्यंतचा सगळ्यात धोकादायक रस्ता होता, सगळा रस्ता कच्चा अधे मध्ये चिखल आणि माती आणि या उपर डावीकडे दरी, थोडी जरी गाडी स्लिप झाली तर कपाळमोक्षच! जर कधी चुकुन जरी तिथे पाऊस पडला तर उगाच कोणत्या दरडी खाली येऊन हाल हाल होऊन मरण्यापेक्षा आपण स्वत:च गाडीसकट दरीत उडी टाकणे बरे असे आमचे प्रांजळ मत झाले होते, असो तशी काही परिस्थिती आली नाही. खर तर मनाली ते लेह पार केल्यावर सगळा रस्ता चांगलाच असेल अशी आमची गोड गैरसमजुत होती, आणि झोझिला पासने तर त्याला एक मोठ्ठा सुरुंगच लावला, रोहतांगचा आजोबा आणि तांगलांगलाचा बाप होता झोझिला तिथे माती चिखल तर होतेच आणि सोबतीला लाइनमध्ये थांबलेले शेकडो ट्रकसुद्धा होते, जर चुकुन जरी एखाद्या ट्रकवाल्याला हुक्की आली आणि त्याने गाडी उलट सुलट मागे पुढे केली तर तिकडे किमान ६-८ तास ट्रॅफिक जॅम होईल अशी परिस्थिती होती.



झोझिला पास पारकडुन आपण सोनमर्गमध्ये येतो, आत्ता पर्यंत फक्त बातम्या आणि TV वर पाहिलेल्या आणि ऎकलेल्या जागा बघताना मजा येत होती. सोनमर्गला आम्ही जेवायला थांबलो, तिथे एक विचित्र गोष्ट पाहायला मिळाली, आम्ही हॉटेलमध्ये बसलो होतो, तिकडे २-४ मुले आली आणि म्हणाली, अरे TV लगाव अपना मॅच आ रहा है, आम्ही म्हंटले India ची कोणती मॅच चालु आहे तर तेव्हा श्रीलंका आणि पाकिस्तानची मॅच चालु होती?? अर्थातच अपना म्हणजे श्रीलंका नक्कीच नव्हते. या उपर सांगायचे तर आम्ही हॉटेलमधुन बाहेर आलो तर तिकडे चक्क पाकिस्तानच्या क्रिकेट टीमचा युनिफॉर्म घालुन दोन पोर फिरत होती, यावर काय बोलावे काहीच कळत नव्हते आणि तिथे बोलायची सोय नव्हती . बर अस सुद्धा नाही की अगदी सीमेजवळचा भाग होता, आणि अमरनाथ यात्रेचा एक टप्पा तर सोनमर्गपासुनसुद्धा सुरु होतो आम्ही लगेचच निघालो तिकडुन.

सोनमर्ग ते श्रीनगर जवळपास १०० किमी आहे जे जायला आम्हाला २ - १/२ तास लागले. श्रीनगरला पोहोचल्यावर आधी आम्ही दाल लेकच्या आसपासच्या भागात एखादी House boat मिळते का ते बघत होतो, एक दोन पाहिल्यासुद्धा पण त्या फारच बेकार होत्या त्यामुळे तो option सोडला आणि एक चांगले हॉटेल शोधले आणि तिकडे सामान टाकले, थोडेसे बाजारात फिरलो, जेवण केले आणि रुमवर येऊन झोपलो. प्रचंड थकलो होतो, आणि दुसर्‍या दिवशी मोठा पल्ला गाठायचा होता.


Click here for part 4
Click here for part 5

Click here for part 7
Click here to view our planning for the trip